Monday, November 25, 2013

सुरुवात..!

   प्रत्येक गोष्ट नवीन असतेच तीच नाविन्य असत. आपण म्हणतो न एखादी गोष्ट सदैव तीच अस्तित्व टिकवून असते आणि तीच काळासोबत पुढे जात राहते. अस म्हणतात ज्यात खरच दिव्यत्व असत, भव्यता असते, तेज असते आणि सत्यता असते ती गोष्ट मात्र "ज्ञानेश्वरी" सारखी हजारो वर्षे सुवर्ण मंदिराच्या खांबा सारखी आपल अस्तित्व टिकवून असते.

  मीही तोच विचार धरून चालतो, आणि तसाच विचार करत राहीलही. आपण जे जगतो ते लिहून काढणे म्हणजेच सत्याशी रोज भेटत राहणे आणि तेच जगताना मिळत गेलेलं आपल्या लेख्या जोख्यात वाढवत जाने हीच खरी लेखकाची संपत्ती! तुमच्या चांगल्या कामासाठी ईश्वरही सदैव उभा असतो, तो सत्याला धरूनच मदत करतो.

  माझ्या लिखाणाच अस्तित्व मला टिकवायचंय, त्याला प्रगल्भ करायचंय. हि सुरुवात आपल्या साक्षीने आणि सदिछ्या सोबत घेऊन करत आहे. प्रवास एकट्याचा कधीच नसतो आणि तुम्ही आहातच माझ्या सोबत ह्या एका नव्या प्रवासात..!

4 comments: