Thursday, May 8, 2014

आकाशवाणी..!


मित्रहो, नमस्कार.

खूप दिवसांनी मी ब्लॉग लिहितोय. मधे असं काही घडल कि तुम्हा सर्वांसोबत बोलायला वेळच मिळाला नाही. मी हैद्राबाद सोडलं, पुण्यात आलो.
खूप जणांसोबत बोललो नाही. खूप लोकांना जवळच्या मित्रांना सांगितलं नाही पण शेवटी मी दूर गेलो असं काही नाही.

मजेदार गोष्ट म्हणजे मी कुठे जरी गेलो तरी माझ्यातलं मराठी मन कसे सोडलं. मी दुसर्या राज्यात जाऊन आदरणी लोकांना "जय महाराष्ट्र" म्हणायला लावलं तसच मी त्याच्याही संस्कृतीशी एकरूप झालो. मला खूप काही शिकायला मिळाल, मी खूप "माणसांना" भेटलो आणि माझा प्रवास सुरु ठेवला. पण कला क्षेत्रात काही आपलाही योगदान असाव ती जिद्द मात्र माझ्या मनात कायम जिवंत आहे.

माणसाबद्दल आपण बराच बोललो पण त्याहून वेगळी मानस आपल्या अवती भोवती असतात हे मात्र "आय. टी." क्षेत्रात येउन विसरल्यागत झाल होत.
११ एप्रिल २०१४ रोजी मी एक मुलाखत घेतली आणि ती हि "पुणे आकाशवाणी" वर.. विषय होता "रविवारचा आदिवासिसाठीचा दवाखाना".. आणि भेट झाली एका जगावेगळ्या व्यक्तीसोबत "उपेंद्र देशमुख (काका)". निःस्वार्थ आदिवासी लोकांसाठी काम करणारा माणूस. मुलांची शिक्षण व्हावीत, तरुण मुलांची प्रगती व्हावी या साठी लढणारा हा महामानव.

रायगड जिल्हा, "आतोने" या गावी ते "कामाला भानू" प्रतिष्ठान अंतर्गत काम चालवतात. कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करता. पुण्यात आलो आणि पहिल्यांदी काकाची मुलाखत घेऊन आकशवाणी वर येण्याची संधी मिळाली. आकाशवाणी वर आपणही एखादा कार्यक्रम करावा, आपला आवाज आपण ऐकावा हि बालपणाची इच्छा शेवटी ४ मे २०१४ रोजी पूर्ण झाली.

आता मात्र अशा जगावेगळ्या माणसांच्या शोधत भटकाव, मानस शिकवीत, मानस भेटावीत आणि अशा बाळगतो कि जगावेगळ्या माणसांची शृंखला अशीच वाढत जावी.. बराच लिहायचं माझ्या बद्दल, पुणे शहराबद्दल.. नव्या माणसांबद्दल... तुमच्या साठी तुमच्या सोबत..!

धन्यवाद...!

Monday, January 6, 2014

वर्षाअखेर...!


वर्षाअखेर...

कधी मला पण समजून घ्या रे..
कधी मला पण कवेत घ्या रे..
हे तार्र्यानो हे दिशांनो...
कधी मला पण उडू द्या रे...!

वर्षा अखेर पुह एकदा तेच लिहाव, तेच जगावं का काही तरी नव्याने उपजत आपण आपलाच जपून ठेवलेलं, लेख्या जोख्यात साठवून ठेवलेलं तेच काढून तसच गिरवाव. असा वाटल तरी वर्ष बदलतात, दिवसं सरतात.
आणि प्रारब्ध हि आपलंच असत आपल्याच हातात.

मी म्हणालो तसं,
" ती कविताही सोडून गेली, केवळ नव्याने जन्माला येण्यासाठी"
असंच सगळ सुटत गेल, वाटत नव्यानेच जन्माला येण्यासाठी.. कारण तेच, कोण आहे इथे ओळखीच? सगळेच अनोळखी फक्त हृदय तेवढ तसच चालणारं.. आपल्याच सोबत आणि ती स्पंदने..! तो आनंदही तूच तुझा शोधायचा, तो उत्सवही तू तुझाच करायचा, आणि जगायच तसच एकदम जोशात...

"कारण आयुष्य म्हणजे उत्सव आणि उत्सव म्हणजेच आयुष्य..."
मला वाटते एवढच पुरे.. वर्षा अखेर.. आणि नव्या सुरुवातीला...!