Monday, January 6, 2014

वर्षाअखेर...!


वर्षाअखेर...

कधी मला पण समजून घ्या रे..
कधी मला पण कवेत घ्या रे..
हे तार्र्यानो हे दिशांनो...
कधी मला पण उडू द्या रे...!

वर्षा अखेर पुह एकदा तेच लिहाव, तेच जगावं का काही तरी नव्याने उपजत आपण आपलाच जपून ठेवलेलं, लेख्या जोख्यात साठवून ठेवलेलं तेच काढून तसच गिरवाव. असा वाटल तरी वर्ष बदलतात, दिवसं सरतात.
आणि प्रारब्ध हि आपलंच असत आपल्याच हातात.

मी म्हणालो तसं,
" ती कविताही सोडून गेली, केवळ नव्याने जन्माला येण्यासाठी"
असंच सगळ सुटत गेल, वाटत नव्यानेच जन्माला येण्यासाठी.. कारण तेच, कोण आहे इथे ओळखीच? सगळेच अनोळखी फक्त हृदय तेवढ तसच चालणारं.. आपल्याच सोबत आणि ती स्पंदने..! तो आनंदही तूच तुझा शोधायचा, तो उत्सवही तू तुझाच करायचा, आणि जगायच तसच एकदम जोशात...

"कारण आयुष्य म्हणजे उत्सव आणि उत्सव म्हणजेच आयुष्य..."
मला वाटते एवढच पुरे.. वर्षा अखेर.. आणि नव्या सुरुवातीला...!  
 

No comments:

Post a Comment